⭕ *पीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी- संदिप गवई...*⭕



( बुलढाणा / मेहकर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕  बुलढाणा / मेहकर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ माचॅ शनिवार:- बुलढाणा मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने बुलढाणा जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आस्मानी संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला आर्थिक मदतीचा मोठा हात हवा आहे. त्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपध्दग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई , मा. कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना मेहकर तहसिलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. की, बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. सोबतच वादळ आणि गारपीट ही झाली. तूर, हरभरा,मका,कापूस,भाजीपाला, कांदा,गहू तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाला देखील मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. पोल्ट्री फार्म, गोट फार्म तसेच मेंढ्या,बैल, गायी तसेच अन्य पाळीव प्राणीदेखील वादळ,पाऊस आणि गारपिटीच्या मायने मृत्युमुखी पडले आहे. यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व शेतीपूरक व्यवसाय करणारा लघू व्यवसायायिक अडचणीत सापडला आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतमजुरांना देखील हाताला काम नसल्याने त्यांना किमान मानधन जाहीर करावे, अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments